महाराष्ट्र विधानसभेबाहेर शिंदे-उद्धव गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी : पावसाळी अधिवेशनात गोंधळ, विरोधकांनी दिल्या '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा...
महाराष्ट्र विधानसभेबाहेर शिंदे-उद्धव गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी : पावसाळी अधिवेशनात गोंधळ, विरोधकांनी दिल्या '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा...
![]() |
| Maharashtra,Maharashtra-Vidhansabha,Maharashtra-Vidhansabha-Rada,Maharashtra-Politics,Maharashtra-Pawsali-Adhiveshan,Latest-News,50-Khoke-Ekdam-Oke,राजकारण, राष्ट्रीय, महाराष्ट्र, |
"50 खोके... एकदम ओके" नारा
उद्धव गटाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या '50 खोके... एकदम ओके' अशा घोषणा दिल्या. या घोषणेच्या आडून शिंदे गटाला 50 कोटींना विकल्याचा आरोप करण्यात आला. महागाई आणि शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत सरकारकडे जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार गाजर घेऊन पोहोचले. गाजरावरूनही दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढे येऊन आमदारांना शांत केले. त्यानंतरच सभागृहाचे कामकाज सुरू होऊ शकले.
धर्मांतरविरोधी कायदा करण्याची भाजप आमदारांची मागणी...
राज्यातील अहमदनगरमध्ये धर्मांतराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सभागृहात सांगितले. राज्यात अशा घटना वाढत आहेत. राणे म्हणाले की, हिंदू मुलींना आमिष दाखवण्यासाठी मुलांना रेटकार्ड दिले जाते, त्याअंतर्गत या मुलांना पैसे मिळतात.
राज्यात हिंदू मुलींना टार्गेट केले जात असून त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा व्हायला हवा, असे राणे यांचे म्हणणे आहे.
आमच्या सर्व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी आताच आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा !
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा